काही जखमा ह्या वेदना विरहित असतात. त्या कधी आपलं व्रण सोडून देतात ते कळूनयेत नाही. रक्त ओघळलं तरी त्याची जाणं होत नाही. पण जेंव्हा ते नजरेआड येतं. तेंव्हा कपाळी प्रश्नार्थी आठ्या पडतात ? हे कधी झालं ? कस झालं ?कुठे झालं ? शोधार्ती मनं मागोवा घेत राहतं. पुन्हा ते थांबतं. किंचितसं कळवळतं. पुन्हा हसतं. पुन्हा …